loader
Breaking News
Breaking News
Foto

सिना कोळगाव साठी शेतकऱ्यांच्या एकजुटीची गरज

कृष्णानदीला पूर आल्याने पुराचे पाणी हे दुष्काळी कवठेमहांकाळ, जत,सांगोला तालुक्याला सोडण्याचा निर्णय मा जलसंपदा मंत्र्यांनी घेतला,खर तर हा योग्य व दुष्काळी जनतेची तहान भागवणारा निर्णय होता, करमाळा तालुका व व तालुक्यातील पुर्व भाग देखील अशाच पद्धतीने दुष्काळी पिण्याच्या पाण्याची भ्रांत असणारा तर पश्चिम भाग हा उजनी सारख्या जलसागराने व्यापलेला व ऊस,केळी च्या हिरवाईने पुर्व भागाच्या कडेच्या गावामधून जाणाऱ्या सीना नदीच्या काठावर साधारणतः पंधरा वर्षापूर्वी कल्याण सागर (सिना कोळगाव धरण) हे साधारण सहा टीएमसी चे धरण करमाळा व मराठवाड्यातील परंडा तालुक्याच्या सीमेवर बांधले आहे,

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

परंतु आजतागायत पाच-सहा वर्षे सोडली तर नेहमी कोरडेठाक हे पहायला मिळतं, मूळतःच पर्जन्यमान कमी असलेल्या नगर पारनेर पासून सीना नदीचे उगमस्थान असल्याने नगरच्या पावसाने दोन -तिन वेळाच हे धरण भरू शकले त्यातही पाच वर्षापूर्वी जामखेड तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे दोन टीएमसी चे धरण बांधल्याने वरून येणाऱ्या पाण्याची आशा न बाळगलेलीच बरी अशी अवस्था आहे, अशा अवस्थेत धरण फक्त नावासाठीच आहे की काय असा समज पहायला मिळतो, निसर्गाच्या अवकृपेने धरण हे भरू शकत नाही हे लक्षात आल्याने मध्यंतरी कुकडी चे ओव्हर फ्लो झालेलं पाणी हे कुकडीच्या कालव्यातून निमगाव गांगर्डे येथील धरणात व तेथून सीना कोळगाव येथे सोडण्याची मागणी झाली त्यासाठी शाहूदादा फरतडे यांनी तर कोळगाव ते मंत्रालय असा मोर्चा देखील काढला,त्यासोबतच धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष सतीशबापू नीळ यांनी वारंवार निवेदन दिले परंतु हे काही एका दोघांचे काम नाहीये व त्यास योग्य जनरेटा नसल्याने पुढे काहीच हालचाली दिसून आल्या नाहीत,तसेच मराठवाड्यासाठी राखीव एकवीस टीएमसी चे पाणी उजनी द्वारे कोळगाव धरणात व तिथून पुढे लातूर ला सोडण्याचा निर्णय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना झाला होता मात्र त्याच देखील काम हे कासवगतीने चाललेय व अजून कमीतकमी दहा वर्षे पूर्णत्वाला जाईल याची खात्री नाहीये,

लेखक -

तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मानसिकता देखील हा पूर्व भाग मागास च रहावा अशीच राहिली आहे, मताचा जोगवा मागताना जनतेची भूकच लक्षात न आलेले लोकप्रतिनिधी तरी काय कामाचे हा सवाल आता प्रत्येकाला पडू लागलाय, आपल्या तालुक्यातील पश्चिम भागातील पुढारी,नेते हे राजकारणापूरते राजकारण करतात व इतर वेळी पाण्यासाठी एकत्र लढलेले आपण पाहिलेले आहेत कारण घर नीट असेल तर गाव नीट राहत हे त्यांना लक्षात आलं आपण मात्र अजून एकमेकांना पाडापाडीत च रस मानत आहोत, पिढ्या न पिढ्या अठराविश्व दारिद्र्य हे जोपर्यंत आपल्या रानात पाणी खेळणार नाही तोपर्यंत सुटणार नाहीये परंतू त्यासाठी गरज आहे आपल्यातील सर्वपक्षीय एकीची, चळवळीची,अन आपल्या पुढच्या पिढीला कायमस्वरूपी पाणी मिळवून देणाऱ्या जनआंदोलनाची

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

उजनीची पाणी पातळी वाढत चालल्याने सध्या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पुर्व भागातील सिना कोळगाव धरण मात्र पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. नगर व धाराशीव जिल्हयातील पावसावर हे धरण भरणे अवलुंबन आहे. तसचे कुकडी चे ओव्हर फ्लो पणी या धरणात येवु शकते या मागणी साठी या भागात अनेक आंदोलने झाली परंतु नेते मंडळी नी या मागणी कडे दुर्लक्ष केले आहे. आता या मागणी साठी शेतकऱ्यांनी राजकिय जोडे बाजुला सोडुन एक येवुन लढा द्यावा असे आवहान शेतकरी पुत्र डॉ विजयसिंह सरडे यांनी केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts