नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील उडीद, सूर्यफूल, मका, केळी ,द्राक्षे भाजीपाला फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. पंचनाम्या नंतर जवळपास सहा महिन्यानंतर ४८ कोटी रूपयांचे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे . सहा महिन्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली खरी मात्र यादीत नाव असूनही तालूक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आधार नंबर च्या चुका, बॅंक खाते क्रमांक चुकीचा, तर कुठे शेतकऱ्यांचे नाव चुकल्याने अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही . अजुनही नुकसान ग्रस्त शेतकरी बॅंकेत, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालयात हेलपाटे मारून बेजार होत आहे.मात्र एकाही ठिकाणी ठोस असे समाधानकारक उत्तर शेतकऱ्यांना मिळत नाही.
अतिवृष्टीत यादीत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यापूर्वी पुन्हा एकदा मे महिन्यात झालेल्या अवकाळीचा फटका बसला आहे मात्र अजून नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पैसे नाहीत मग नुकत्याच झालेल्या नुकसानीचे पैसे मिळतील का? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे .
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा देखील बट्ट्याबोळ= प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा करमाळा येथे बोजवारा उडाला असून जिवंत असलेले शेतकरी मृत दाखवले गेले आहेत, तर अनेक शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्ड गायब झाल्याने त्यांना पुन्हा सातबारा उतारा, फोटो आधार कार्ड घेऊन येण्यास सांगीतले जात असून अनेक वयोवृद्ध शेतकरी वर्षभरापासून तहसिल ऑफिस मध्ये खेटे घालत आहेत.
बॅंक कर्मचारी, तहसिल ऑफिस तलाटी कार्यालयात उडवा उडवीची उत्तर मिळत असल्याने खजील झालेल्या शेतकऱ्याची अवस्था 'राजाने मारले अन् पावसाने झोडपले' तर दाद कुणाकडे मागायची अशी झाली आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.