ब्रह्मदेव आला तरी वीजबिल भरल्याशिवाय कनेक्शन जोडणार नाही अशी मस्तवाल भाषा वापरणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याला व शासनाला देवेंद्र फडणवीस यांच्या अक्रमक पावित्र्या पुढे अखेर झुकावे लागले असून शेतकऱ्यांना वीजबिल वसुलीसाठी मिळालेली सवलत हि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मिळाली आहे असे मत भाजापा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे
या वेळेस अधिक बोलताना गणेश चिवटे म्हणाले की कोरोनातुन सावरत असलेला शेतकरी अतिरिक्त उसाचा प्रश्न, रब्बीच्या सुगीसाठी मजुरांची कमतरता या मुळे मेटाकुटीस आला होता.मात्र महाविकास सरकारकडून वारंवार वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करून पठाणी वसुली करण्यात येत होती.फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली केली नाही.महाविकास आघाडी सरकार मात्र शेतकऱ्यांच्या सध्य परस्थीतीचा विचार न करता शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करून मग्रूरीची भाषा वापर होते.पंढरपूर येथील युवक शेतकऱ्यांने वीजबिल वसुलीच्या तगाद्या मुळे आत्महत्या करुन देखील सरकाराला पाझर फुटला नव्हता .
अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिल प्रश्नावर अक्रमक पणे आवाज उठवला व वीजतोड तात्काळ थांबवावी अशी मागणी करुन शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध होईल पर्यंत दिलासा देण्याची मागणी केली होती.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.