आगोदर वीजबिल दुरूस्ती करा मगच शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करा अशी महत्त्वपूर्ण मागणी काँग्रेस आय चे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी महावितरण चे अभियंता जाधव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
काँग्रेसच्या या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यतील शेतकऱ्यांना वाढीव H.P. ची बिले देण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. न.3 H.P. वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 H.P. ची बिल देण्यात आली आहेत.जे शेतकरी 5 H.P. वापरतात त्यांना 7.5 H.P.ची बिले तर जे शेतकरी 7.5 H.P.वापरतात त्यांना 10 H.P. ची बिले देण्यात आली आहेत.यातुन वापर न झालेल्या H.P, ची बिले विनाकारण शेतकऱ्यांवर लादण्यात आल्याने बिलाचा आकडा फुगला असून एकरकमी परतफेडीचा लाभ खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांना होत नाही त्यामुळे महावितरण ने शेतकऱ्यांकडून दुरुस्ती साठी अर्ज घेऊन वीजबिल कमी करून द्यावे
कोरोनाच्या संकटातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांकडून टप्पे पाडून वसुली करावी सध्या शेतकऱ्यांचा उसाच्या गाळपाचा प्रश्न गंभीर आहे.अनेक कारखान्याकडुन पहिला हप्ता आलेला नाही त्यामुळे शेतकरी आगोदरच अडचणीत असुन महावितरणने सामंजस्याने भुमिका घेऊन वसुली करावी असे देखील नमूद करण्यात आले आहे.या वेळी सरचिटणीस संभाजी शिंदे तालुका उपाध्यक्ष- अशोक घरबुडे,दादासाहेब पवार,प्रताप खाडे अमोल पवार,सुजय जगताप,नितीन चोपडे,योगेश राखुंडे,बापू खाडे,शेषराव केकान, आदी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.