करमाळा तालुक्यातील वीजबिल वसुली साठी कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरु असून या संदर्भात सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील काही भागात विशेषतः उजनी बॅकवॉटर परिसरातील वीज पुरवठा हा महावितरण कडून खंडीत केला गेला असून शेतकरी वर्गात याबाबत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या प्रश्नावर महावितरणचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसिलदार यांना एक निवेदन सादर करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील कृषीपंपाचा वीजपुरवठा गेले दहा दिवसापासून बंद करण्यात आला आहे. महावितरण विभाग वीजबिल वसुलीचे कारण दाखवून कृषीपंप वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम अधिक वेगाने करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
करमाळा तालुक्यातील ऊस, केळी, द्राक्ष या नगदी पिकासह भाजीपाला व इतर पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील उभ्या पिकांचे पैसे, ऊस व केळी बिलाची रक्कम हाती आल्यानंतर अवश्य स्वतःहुन वीज बिल भरतो पण आता वीजजोड तोडू नका अशी विनंती शेतकरी महावितरणला करत असताना सुद्धा महावितरणकडून या वीजतोड मोहीमेस ब्रेक लागत नाही.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.