करमाळा तालुक्यात जिल्हा दुध संघाच्या माध्यमातून राजकीय धुळवड सुरु झाली असून, नगरपालीका, जिल्हापरिषद पंचायत समिती , आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकांने या मध्ये रंगत येणार आहे. तालुक्यातील गटातटाचे राजकारण लक्षात घेता तालुका पातळीवर प्रमुख नेतेमंडळींचा युत्या आघाड्या करण्यापासून, उमेदवार ठरवणे, बंडखोरांना थोपवणे याबाबत कस लागणार असून नेतेमंडळची चांगलीच डोके दुखी वाढणार आहे. याबाबत सा चौफेर चे पत्रकार शंभुराजे फरतडे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा.
करमाळा तालूक्यात आगामी काही आठवड्यात निवडणुकांचे सत्र सुरू होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती, करमाळा नगरपालिका, आदिनाथ सहकारी साखर कारखाना या निवडणुका एकापाठोपाठ एक अशा येत असून रणधुमाळी सुरु झाली आहे. वास्तविक पाहता करमाळा तालूक्यात गटातटास प्राधान्य देऊन निवडणुकांची रणनिती आखली जाते. यामुळे जो तो गट आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार हे तर उघडच आहे. परंतु करमाळा तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ते अथवा सहकारी गटांच्या युती आघाडी यामध्ये बदल होतातच हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
आजवर मागील निवडणुकीतील गटांची समिकरणे पुढील निवडणुकीत तशीच स्थिर आणि कायम राहीली आहेत असे एकही उदाहरण शोधुनही सापडणार नाही. यामुळे मग पाटील गट, बागल गट, शिंदे गट व जगताप गट या गटांसह मोहिते-पाटील गट,नागरी संघटना, सावंत गट, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, काँग्रेस, आरपीआय, प्रहार संघटना, बहुजन संघर्ष सेना, अतुल खुपसे यांची जनशक्ती संघटना ,शिवप्रताप युवा प्रतिष्ठान, आदि गट व संघटना तसेच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उमेदवार उभे करणार.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.