आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील या दोन गटांत सुरु असलेले वाकयुध्द आरोप-प्रत्यारोप व टिका-टिप्पणी ने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .या ना त्या कारणावरून या दोन गटांत सतत शाब्दिक संघर्ष सुरु आहे. आज आमदार संजय मामा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील विकासकामांवर चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी निषाणा साधत.आगोदर आमदार आपल्या दारी संकल्पनेचे काय झाले असा सांगा म्हटले आहे.
"दिल्ली वारी" दुर ठेवा, अगोदर "आमदार आपल्या दारी" संकल्पनेचं काय झालं ते सांगा ? असा सवाल पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला असून शेतकऱ्यांच्या नजरेला नजर देऊन बोलायला जी नैतिकता लागते ती नैतिकता आ. संजयमामा शिंदे यांच्या कडे नसल्याचा सणसणीत टोला त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे लगावला आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांनी नुकताच "दिल्ली दौरा" करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले त्यावर पाटील गटाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत अधिक बोलताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 2014 ते 2019 मध्ये अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागली. तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी आठवड्यातील तीन दिवस मुंबईतील मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी दिले व उर्वरित चार दिवस मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकुन घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी दिले. यामुळेच रस्ते, सिंचन, वीज, आरोग्य व कृषी विभागातील कामे मार्गी लागली. परंतु 2019 मध्ये मात्र विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील 115 गावासाठी आठवड्यातील एक दिवस देत आहेत त्यातही कधी नियमितता दाखवली नाही असे देखील तळेकर यांनी म्हटले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.