काल दिग्विजय बागल यांच्या निवास्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिग्विजय बागल यांनी जगतापांच्या कारभारास जनता कंटाळली असून परिवर्तन अटळ असल्याचे सांगत सोबत येतील त्यांना सोबत घेवुन बागल गट संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे आवाहन दिले होते.
करमाळा चौफेर च्या पोर्टल ने हे वृत्त प्रसिद्ध करताच जगताप गटाकडून देखील नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी जोरदार पलटवार केला असून विश्वासार्हता गमावलेल्या बागलांच्या तोंडी आव्हानाची भाषा शोभत नाही अशी टिका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाततुन केली आहे
यावेळी अधिक बोलताना जगताप म्हणाले की शहरवासियांचा जगताप गटावरच ठाम विश्वास हे गेली २५ वर्षाच्या कामकाजावरून सिद्ध झाले आहे मात्र आदिनाथ व मकाई कारखान्यांच्या कारभारातून अमाप भ्रष्टाचार करून बागलांनी तालुक्यातील शेतकरी व कामगारांचे प्रपंच उद्धवस्त केले . त्याचे भोग तालुक्यातील जनता आजही भोगत आहे . बागलांनी काठावर ताब्यात आलेल्या मांगी ग्रामपंचायतीमधील गटारी तुंबून तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे अगोदर त्याकडे लक्ष द्यावे, बागलांच्या मांगीतील कारभाराला ग्रामस्थ कंटाळल्यामुळेच निम्मे मतदान विरोधात जावून जाता -जाता ग्रामपंचायत राहिली आहे .त्यांनी त्याची काळजी करावी .शहरातील जनता सुजाण असल्यामुळे बागलांचे कोणतेही वक्तव्य गांभीर्याने घेत नाही असे मत जगताप गटाचे युवानेते नगराध्यक्ष वैभव आबा जगताप यांनी व्यक्त केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.