फसव्या घोषणा करणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा ठेवाव्या असे वक्तव्य जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी दिलमेश्वर (ता. करमाळा) येथे जनशक्ती संघटनेच्या शाखा उदघाटन व शेतकरी मेळाव्या दरम्यान केले आहे .
यावेळी अधिक बोलताना खुपसे म्हणाले की, स्थानिक आमदार महोदयांकडून रस्ते, पाणी व सिंचन यासाठीचे कोट्यवधी रुपयांचे आकडे नुसतेच बोर्डावर आहेत. याचा सामान्य जनतेला कवडीचा देखील फायदा नाही. जर ६ महिने गावचे ट्रांसफार्मर बंद असतील तर अश्या निष्काळजी आमदार कडून आपण काय अपेक्षा कराव्या. निवडणुकीत मतदानावेळी नुसत्याच विकासाच्या आणाभाका केल्या. मात्र अडीच वर्षानंतर वीज आणि पाणी अशा मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्या तर जनतेने व्यथा मांडायच्या कुणाकडे असा सवाल करून मतदाना पुरते फसवी आश्वासने देणाऱ्यांना वेळीच ओळखा असे आवाहन देखील जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी केले.
यावेळी बागल गटातून पार्टी प्रमुख वैभव मस्के यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यावेळी वैभव मस्के म्हणाले की गावच्या विकासासाठी व शेतकरी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनशक्ती संघटनेत प्रवेश करत आहोत. गावच्या ज्या काही अडचणी आहेत त्या जनशक्ती च्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी स्वताला झोकून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.