कोरोना लसीकरणासाठी गावागावात लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे असताना सुद्धा गावचे सरपंच लसीकरणासाठी साथ देत नसल्यामुळे त्यांचे सरपंच पद का रद्द करण्यात येऊ नये? अशा प्रकारची नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील ५५ गावच्या सरपंचांना धाडली आहे. करमाळा तालुक्यातील सात गावांच्या सरपंचांचा यात समावेश असल्याने सरपंचाचे धाबे दणाणले आहेत.
मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ३९ अनुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत नोटीस बजावत कडक पावले उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लस देण्यात येते. गावागावातील आशा वर्कर्स यासाठी जनजागृती करतात. वाड्या-वस्त्यांवरती जाऊन लोकांना समजावतात मात्र, सरपंच लसीकरणाबाबत गांभीर्य बाळगत नसल्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर राज्य शासन लसीकरणाबाबत प्रचंड गंभीर झाले असून प्रशासन सध्या त्यासाठी मिशन मोडवर आहे.करमाळा तालुक्यातील उंदरगाव, धायखींडी, बिटरगाव श्री, पोंधवडी, बिटरगाव (वां) निमगाव (ह) आवाटी या सात गावामध्ये लसीकरण टक्केवारी कमी असल्याने या सात गावातील सरपंचाना मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्यावर पद रद्द करण्याची कारवाई का करु नये असे विचारत नोटीस बजावली आहे.उंदरगाव येथे 52 % धायखींडी येथे 55% ,बिटरगाव श्री 55% पोंधवडी 57% बिटरगाव (वां ) 61% , निमगाव ह 61%,आवाटी62% लसीकरण झाले आहे.असे आरोग्य विभागाकडून कळवले आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.