एस टी कर्मचारी संपामुळे करमाळा आगारास दिड ते दोन कोटींचा फटका बसला असल्याची माहिती आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना दिली असून आपली लालपरी पुन्हा डौलात धावावी, वाहकाच्या घंटीचा आवाज पुन्हा ऐकू यावा, पुन्हा आपले बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजावे, विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचे व रुग्णाना दवाखान्यात पोहोचवण्याचे पुण्य आपल्याकडून घडावे, भाविक भक्तांना मंदिरात पोहोचवण्याचे भाग्य आपल्याला लाभावे आपल्या लालपरीच्या भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी कामावर हजर व्हा असे भावनिक आवाहन किरगत यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.
या वेळी अधिक माहिती देताना किरगत यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिनांक 28/10/21 पासून संप पुकारला आहे. दिनांक 7/11/21 पासून रा प करमाळा आगार या राज्यव्यापी संपात सामील झाले आहे. परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांनी पगारवाढ केली आहे. ती पगारवाढ देखील कामगारांना मान्य नसल्याने कामगार कामावर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे लालपरी ची वाहतूक ठप्प आहे.
आपली लालपरी खुप दिवसांपासून बंद आहे. संपापुर्वी दररोज 9-10 हजार प्रवासी करमाळा आगाराच्या बस मधून प्रवास करत होते. 61 बसेसच्या माध्यमातून दररोज सुमारे 190 फेऱ्या चालवल्या जात होत्या. सध्या आगारात फक्त आगार व्यवस्थापक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक ,सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एवढेच जण हजर आहेत. इतर सर्व कर्मचारी गैरहजर आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.