निम्मा पावसाळा संपला आद्यापही म्हसेवाडी तलाव कोरडा.शेतकरी चिंताग्रस्त ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

निम्मा पावसाळा संपला आद्यापही म्हसेवाडी तलाव कोरडा.शेतकरी चिंताग्रस्त

पुर्व भागातील म्हसेवाडी तलाव हा या परिसरातील म्हत्वाचा तलाव आहे. हा तलाव भरल्यानंतर पांडे, अर्जुनगर व म्हसेवाडी येथील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा देखील प्रश्न सुटला जातो. परंतु निम्मा पावसाळा संपत आला तरी तलाव आद्यापही कोरडा ठणठणीत असल्याने राहिलेल्या पावसाळ्यात तरी तलाव भरेल का याची चिंता परिसरातील शेतऱ्यांना सतावत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुर्व भागात अद्यापही मोठा पाऊस झाला नसुन रिमझिम पावसा वरच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आहे.आधुन मधुन रिमझिम पाऊस पडल्याने पिके सध्या तरी जोमात असुन खरिप हंगाम शेतकऱ्यांना फायद्याचा ठरेल अशी शक्यता आहे, मात्र आद्यपही मोठा पाऊस नसल्याने पाणी साठा झालेला नाही त्या मुळे विहिर, बोरवेल ,हतपंप यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नसुन भविष्याची चिंता सतावत आहे

पांडे प्रतिनिधी - अमजद मुजावर .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निम्मा पावसाळा संपत आला तरी पांडे म्हसेवाडी व अर्जुनगर गावाची तहान भागवणारा म्हसेवाडी तलाव अद्याप देखील कोरडाच आहे. सध्या पावसाचा एक महिना शिल्लक आहे मात्र अध्याप देखील तालुक्यातील सर्वच तलाव कोरडे आहेत. मांगी तलावत फक्त तिस टक्के पाणी साठा झाला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts