कोर्टी ते आवाटी या राज्य महामार्गाचे दोनपदरी करणाचे काम सुरु असुन अतिशय ढिम्या गतीने हे काम सुरु आहे.काम रेंगाळल्याने संपूर्ण रस्ता धोकादायक बनला आहे. विहीत वेळेत काम पुर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवावा अन्यथा तिव्र आंदोलन करु तसेच आमच्या मागणीकडे संबंधित कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा करमाळा तालुका भाजपा सरचिटणीस काकासाहेब सरडे यांनी दिला आहे.
या वेळी अधीक बोलताना काकासाहेब सरडे म्हणाले की सध्या मकाई, भैरवनाथ, कमलाई तसेच माढा तालुक्यातील देखील कारखाने सुरु आहेत या रस्त्यावरुन हि वाहतूक होत आहे .रस्त्यावरुन जागोजागी पडलेल्या मोठ्मोठ्या खड्डयामुळे उस वाहतूक करणे जिकरीचे होत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे, तसेच परवा झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे त्या मुळे दुचाकीस्वारांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करुन बुजवणे गरजेचे असताना मुरुम व मातीने बुजवले जात आहेत त्यामुळे उन्हाळ्यात प्रचंड धुळ व थोडा पाउस झाला तर चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. एन पी कन्स्ट्रक्शन च्या मनमानी कारभाराविरुद्ध मात्र संबंधित प्रशासन कारवाई करण्यात हलगर्जी करत आहे हे गौडबंगाल असल्याचे देखील सरडे यांनी सांगीतले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.