भिलारवाडी ता करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपुजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला असून ,पूर्ण ताकदीनिशी गाळप करणार असल्याचे व्हाईस चेअरमन अॅड. ज्ञानदेव देवकर यांनी सांगीतले.या वेळी अधीक बोलताना देवकर म्हणाले की यंदाचा ऊस गळीत हंगाम मोठा आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण जास्त आहे. मकाई यंदा पूर्ण क्षमतेने चालवून जास्तीत जास्त गाळप करणार आहे.
या वेळी माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले असुन ते म्हणाले की यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार आहोत. कारखान्याचे साडेतीन लाख ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या असावणी प्रकल्पाच्या माध्यमातून ७५ लाख स्पीरीटचे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण जास्त असले तरी सभासदांचा ऊस मागे ठेवणार नाही इतर कारखान्यासोबतच मकाईची एफआरपी देऊ असे सांगीतले.
यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे आणि संचालक संतोष देशमुख यांचे शुभहस्ते गव्हाण पूजन झाले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिगंबररावजी बागल (मामा) यांचे पुतळ्याचे पूजन कारखान्याचे माजी संचालक मोहन गुळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच सत्यनारायण पूजा संचालक दत्तात्रय गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.