विज बिल वसुलीसाठी सरकारची नवीन चाल समोर आली असून साखर आयुक्तांना हाताशी शेतकऱ्यांच्या उस बिलातुन परस्पर वीजबिल वसुलीचे प्रयत्न सुरु आहेत यास भाजापने विरोध दर्शवला असून शेतकऱ्यांच्या परस्पर कारखान्याला हाताशी धरुन वसुली कराल तर याद राखा ! असा थेट इशारा भाजपा सरचिटणीस अमरजित साळुंके यांचा महावितरणला दिला आहे.
कृषी वीज बिल वसुली हा शेतकरी व वीज कंपनी यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याशी कारखान्यांचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे साखर कारखाना व साखर आयुक्त कृषी विजबिलाच्या वसुलीचा कायद्याने हा अन्यायकारक जुलमी निर्णय घेऊ शकत नाहीत असे असतानाही साखर आयुक्त यांनी विजबिले वसूल करण्यासंदर्भात महावितरण व साखर कारखाने यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे.
अशा पध्दतीने हे जुलमी राज्य सरकार विवीध प्रकारच्या क्लुप्त्या वापरून शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारच्या या प्रकाराचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे असे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी बोलताना सांगितले आहे.उलटपक्षी मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाची बिले अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसतांनाही काही साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळालेच कसे याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.