loader
Breaking News
Breaking News
Foto

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिखलठाण व वांगी गावास भरघोस निधी मिळवून दिल्याबद्दल उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी केला जिल्हापरिषद अध्यक्षांचा सत्कार

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिखलठाण व वांगी गावास भरघोस निधी मिळवून दिल्याबद्दल करमाळा पंचायत समीतीचे उपसभापती पै दत्तात्रय सरडे यांनी सोलापूर येथे जावुन जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचा सत्कार करून आभार मानले आहेत. या वेळी बोलताना उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी अनिरुद्ध कांबळे यांच्या कामाचे कौतुक केले असुन विजयसिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापरिषद अध्यक्ष कांबळे हे ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देत असल्याचे म्हटले आहे. यावेळी केडगाव येथील डाॅ कानगुडे उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी २४ कोटी ७५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध(आण्णा)कांबळे." यांनी नुकतीच दिली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या योजनेतून ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी विहिरी,जलशुद्धीकरण केंद्र,पाणी टाकी,वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा करणे या योजना राबवण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत चिखलठाण नंबर 1 व 2 या गावांसाठी 1 कोटी 98 लाख 766 रुपये तसेच वांगी नंबर 1 व 2 या गावांसाठी 1 कोटी 86 लाख 89 रुपये अशी तरतूद केली केल्याची माहीती अनिरुद्ध कांबळे यांनी दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आमदार संजयमामा शिंदे यांनी देखील पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन याच योजनेसाठी निधी आणल्याची घोषणा केली होती ,या वरुन आत्ता पाटील व शिंदे गटात श्रेयवादाची लढाई रंगण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts