जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिखलठाण व वांगी गावास भरघोस निधी मिळवून दिल्याबद्दल करमाळा पंचायत समीतीचे उपसभापती पै दत्तात्रय सरडे यांनी सोलापूर येथे जावुन जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचा सत्कार करून आभार मानले आहेत. या वेळी बोलताना उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी अनिरुद्ध कांबळे यांच्या कामाचे कौतुक केले असुन विजयसिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापरिषद अध्यक्ष कांबळे हे ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देत असल्याचे म्हटले आहे. यावेळी केडगाव येथील डाॅ कानगुडे उपस्थित होते.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी २४ कोटी ७५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध(आण्णा)कांबळे." यांनी नुकतीच दिली आहे.
या योजनेतून ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी विहिरी,जलशुद्धीकरण केंद्र,पाणी टाकी,वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा करणे या योजना राबवण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत चिखलठाण नंबर 1 व 2 या गावांसाठी 1 कोटी 98 लाख 766 रुपये तसेच वांगी नंबर 1 व 2 या गावांसाठी 1 कोटी 86 लाख 89 रुपये अशी तरतूद केली केल्याची माहीती अनिरुद्ध कांबळे यांनी दिली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.