कोर्टी ते आवाटी रस्त्याचे दुपद्री करणाचे काम सुरु असुन या साठी एन पी कन्स्ट्रक्शन कंपनी कडुन शेलगाव येथे डांबर तयार करण्याचा प्लॅन्ट सुरु आहे मात्र या प्लॅन्ट मधुन धुळी चे कण उडुन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.तसेच डांबराच्या वासाने परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे.
प्लॅन्ट करताना शेतकऱ्यांचे नुकसान होवु नये तसेच हवेचे प्रदूषण होवु नये असा नियम आहे परंतु प्रशासनाच्या आशिर्वादाने या मुजोर कंपनीची दादागीरी सुरु असुन सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत .शेलगाव येथील सुवर्णा किरण विर यांच्या उडिद पिकांचे नुकसान होत असून संबंधित कंपनीचे सतिश बुकन यांना नुकसान भरपाई कधी देणार असे या महिलेने विचारले असता या महिलेस दमबाजी करण्यात आली असून तुम्हाला खंडणीच्या गुन्ह्य़ात अडकवतो असे म्हटले आहे ,माझे सर्व अधिकाऱ्यांना हप्ते आहेत त्या मुळे माझे कोणीही काही बिघडु शकत नाही असे म्हटले आहे.असल्याचे सुवर्णा विर यांनी करमाळा चौफेर शी बोलताना सांगीतले आहे.
दरम्यान एन पी कन्स्ट्रक्शन चे सतिश भुवन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपांचे खंडण केले असुन नुकसान भरपाई देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.