loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवबंधन दोघांच्या हाती ,तरीही का येईना शिवसंपर्क अभियानास गती ? करमाळयात शिवसैनिकांना वाली कोण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाकरे सरकार चे कोरोनाकाळातील लोकोपयोगी कार्य सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवणे व सामान्य नागरींकाच्या तक्रारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतिने राज्यभर शिवसंपर्क अभियान धुमधडाक्यात सुरु आहे . राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आमदार हे प्रत्येक तालुक्यातील जिल्हापरिषद गट पंचायत समिती गणात जावुन शिवसंपर्क अभियान प्रभावी पणे राबवत आहेत. करमाळा तालुक्यात मात्र "शिवसंपर्क अभियान म्हणजे काय रे भाऊ? अशिच परस्थिती आहे असुन सध्या तरी हे अभियान फक्त कागदावरच राबिवले जात असून शिवसंपर्क अभियान करमाळा तालुक्यात फक्त फार्सच ठरते की काय? आशी शंका घेण्यास वाव मिळत आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

2019 च्या विधानसभा निवडणुकीत.एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले रश्मी बागल व शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे दोन्ही म्हतवाचे नेते आजमितीस शिवसेनेतच असल्याचा दाव करीत आहेत माजी आमदार नारायण पाटील यांच्या हाती देखील शिवबंधन असुन स्वताच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो आहे. रश्मी बागल यांचे बंधु दिग्विजय बागल यांच्या मनगटावर देखील शिवबंधन असुन गाडीवर भला मोठा धनुष्यबाण व शिवसेना लोगो आहे मात्र "शिवबंधन दोघांच्या हाती शिवसंपर्क अभियानास येईना गती" आशीच आवस्था आहे.

शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांकडून एकदिलाने काम झाल्यास व पक्षाकडून योग्य दिशा मिळाल्यास करमाळा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जावु शकतो ,मात्र गटबाजी व पदाधिकाऱ्यांत आलेली मरगळ दुर करण्यासाठी सेना नेतृत्वाने लक्ष देणे गरजेचे आहे ,संपर्क प्रमुख यांच्या सोबतच मुंबई वरुन येणारे पक्ष निरीक्षक यांच्याकडून प्रत्येक महिन्याला जिल्हापरिषद गट निहाय पक्ष बांधणी, व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणे गरजेचे आहे असा सुर शिवसैनिकांतुन उमटत आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा माढा या दोन तालुक्या साठी धनंजय डिकोळे हे जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत नुकतीच त्यांनी शिवसंपर्क अभियान बाबत मोजक्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन बैठक घेतल्याने बर्‍याच आजी माजी पदाधिकाऱ्यांकत या अभियाना बाबत माहिती पोहोचली नाही ,अभियान राबवण्या बाबत विचार विनिमय होण्या ऐवजी शिवसेनेची धुरा बागल -की पाटील यांच्यावर या बाबतच अधिक चर्चा झाल्याचे समजते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करायचे व विधान सभा जिल्हापरिषद पंचायत समिती निवणुकांत आयारामांना संधी मिळत असल्याने पदाधिकाऱ्यांकडून फक्त कागदावरच बांधणी सुरु असल्याचे दिसत असुन प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचा पाया सक्षम नेतृत्वाआभावी खचलेला दिसत आहे. आंदोलन मोर्चे, या बाबतीत करमाळ्याची शिवसेना जिल्ह्यात ओळखली जात होती मात्र सध्या शिवसनेला मरगळ आल्याचे वास्तववादी चित्र निर्माण झाले हे कोणीच नाकरु शकणार नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विधान सभा निवडणुकीत काही पदाधिकाऱ्यांनी पक्षादेश मानुन शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांचे काम केले तर काहींनी नारायण पाटील यांचे काम केले .बंडखोरी व गटबाजी मुळे हक्काची जागा तर गमवावी लागलीच मात्र पदाधिकाऱ्यांत झालेली दुफळी अजून देखील संपलेली नाही ,काही बागल यांच्या तर काही पाटील यांच्या संपर्कात आहेत मात्र प्रमाणीक पणे फक्त पक्षाचे काम करणाऱ्यांची संख्या नगण्य झाली आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts