loader
Breaking News
Breaking News
Foto

या कारणासाठी मानले दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार.

करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी सांडपाण्याच्या नावाखाली 5TMC पाणी नेण्याचा ठराव मंत्रीमंडळ बैठकीत झाला होता. हे पाणी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे असल्यामुळे हा निर्णय रद्द करावा अशी विनंती करमाळा तालुक्यातुन सर्व प्रथम मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.दिग्विजय भैय्या बागल यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

त्याच बरोबर जर 5TMC पाणी इंदापूर ला नेण्याचा निर्णय रद्द केला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा दिला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेवून आज जलसंपदा मंत्र्यांना हा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले.त्यामुळेच दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts