loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या उजनी पाण्याच्या भुमिकेवर नेटकऱ्यांकडुन सवाल उपस्थित,दिशाभूल करणारे वक्तव्य असल्याचे युवकांचे मत

उजनी धरणाची उंची दोन मीटरने वाढवा, मगच पाच टीएमसी पाणी इंदापूरला न्या, असे सांगून उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सांडपाणी हा खोटा शब्दप्रयोग वापरुन इंदापूरला नेण्याचा आदेश सरकारने काढलेला आहे. पण हे सर्व सांडपाणी दौंडपर्यतचे शेतकरी उचलतात. त्यामुळे ही निव्वळ दिशाभूल आहे. सोलापूर जिल्ह्यावर हा मोठा अन्याय झालेला आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध राहील यासाठी आंदोलन ही करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार राजन पाटील यांनी दिला. लोकनेते साखर कारखान्यावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की १९९३ साली मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार धरणाची उंची दोन मीटरने वाढविल्यास पाठीमागील जमिनीला कसलाही धोका न होता आणि कोणत्याही शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित न करता १२ टीएमसी पाणी धरणात साठेल. यातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल व राहिलेले ७ टीएमसी पाणी सोलापूर जिल्हााला मिळेल. या योजनेसाठी सरकारला जास्त खर्चही करावा लागणार नाही. उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांनी मोठा त्याग केला आहे. उजनीच्या पाण्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. याचा विसर राज्य सरकारला पडलेला आहे. असा घरचा आहेर त्यांनी सरकारला दिला होता .राजन पाटील यांनी घेतलेली हि भुमिका चुकीची असून दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत माजी आमदार राजन पाटील यांच्या भुमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पत्रकार सुहास घोडके यांनी म्हटले आहे की काल माजी आमदार राजन पाटील यांची मुलाखत ऐकली आणि आज वाचली. ते बोलताना म्हणाले की, उजनी जलाशयातील ५ TMC पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर आमच्यावर खुप मोठा अन्याय होईल त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्ही जिल्हावासीय अथवा तालुकावासीय असल्याचा अभिमान वाटला. पण त्यांनी धरणातील पाणी चोरांचे नाव घेण्यास मात्र जाणीवपूर्वक टाळाटाळ केली हे आवर्जुन लक्षात आलं. पुढे बोलताना ते म्हणाले की १९९३ रोजी मंत्रीमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ फुटाने वाढवली तर धरणात १२ TMC पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ पाणी नेले तर हरकत नाही. म्हणजे १२ Tmc पाण्याची वाढ झाली तर ५ TmC इंदापूरला अर्थात राहिलेले ७ Tmc पाणी कर्जत जामखेडला जावु शकते. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की, उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे आणि त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यासाठीच व्हावा. धरणाची भिंत २ फुटाने वाढवली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. त्यासाठी इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा उजनीवर काही एक अधिकार नाही. #इंदापूरला पाणी नेण्यासाठी सक्त विरोधच राहिल.

मोहोळ येथील शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे की उजनी जलाशयातील पाणीहक्कांबाबत मोहोळ तालुक्याचे माजी आमदार मा. राजन पाटील साहेब यांनी घेतलेल्या भूमिकेत अजिबात स्पष्टता आणि ठामपणा नाही. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्यास विरोध तर केला पण धरणातील पाणीचोरांचे नाव घेणे जाणीवपूर्वक टाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार १९९३ रोजी मंत्रीमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटरने वाढवली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यावेळी ५ टीएमसी पाणी इंदापूरला गेले तरी हरकत नाही. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाल्यावर ५ टीएमसी इंदापूरला, अर्थात राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जावु शकते यात कुठलीही शंका नाही . जरी महाराष्ट्र राज्य सरकारने उजनी धरणाची उंची २ मीटरने वाढवली तरी ते सर्व वाढणारे १२ टीएमसी पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे आहे. कारण सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त असताना सोलापूरला बारमाही पाणी मिळावे यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून या धरणाची निर्मिती झाली होती. पण सध्या उजनीच्या पाणीवाटप नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या सोलापूर जिल्ह्यास मिळत आहेत. जर भविष्यात धरणाची उंची दोन मीटर ने वाढवली तर किमान सोलापूर जिल्ह्याला ८ महिने तरी पाणी मिळेल. उंची वाढवल्यानंतर येणारे अतिरिक्त पाणी हे इथल्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्काचे असेल. ते पुणे जिल्ह्याला किंवा बारामतीला तुमच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा माझा तुम्हाला रोखठोक सवाल आहे. मागच्या दहा वर्षात 4 ते 5 वेळा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला त्यावेळी शासन नियमानुसार उंचावरच्या म्हणजेच पुण्यातल्या धरणातून खाली सोलापूरसाठी पाणी सोडणे आवश्यक होते परंतु त्यावेळी पाणी सोडले गेले नाही. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची तहान भागवण्यासाठीच आहे. त्यामुळे सध्या आणि भविष्यात उंची वाढवल्यावर देखील त्याचा सोलापूरच्या जनतेच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे. इथल्या शेतकरी कष्टकरी जनतेच्या हक्काचं पाणी आम्ही इतर कोणाला देऊ देणार नाही.असे म्हटले आहे

शंभुराजे फरतडे ✍

मोहोळ येथील शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे की उजनी जलाशयातील पाणीहक्कांबाबत मोहोळ तालुक्याचे माजी आमदार मा. राजन पाटील साहेब यांनी घेतलेल्या भूमिकेत अजिबात स्पष्टता आणि ठामपणा नाही. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्यास विरोध तर केला पण धरणातील पाणीचोरांचे नाव घेणे जाणीवपूर्वक टाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार १९९३ रोजी मंत्रीमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटरने वाढवली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यावेळी ५ टीएमसी पाणी इंदापूरला गेले तरी हरकत नाही. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाल्यावर ५ टीएमसी इंदापूरला, अर्थात राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जावु शकते यात कुठलीही शंका नाही . जरी महाराष्ट्र राज्य सरकारने उजनी धरणाची उंची २ मीटरने वाढवली तरी ते सर्व वाढणारे १२ टीएमसी पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे आहे. कारण सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त असताना सोलापूरला बारमाही पाणी मिळावे यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून या धरणाची निर्मिती झाली होती. पण सध्या उजनीच्या पाणीवाटप नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या सोलापूर जिल्ह्यास मिळत आहेत. जर भविष्यात धरणाची उंची दोन मीटर ने वाढवली तर किमान सोलापूर जिल्ह्याला ८ महिने तरी पाणी मिळेल. उंची वाढवल्यानंतर येणारे अतिरिक्त पाणी हे इथल्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्काचे असेल. ते पुणे जिल्ह्याला किंवा बारामतीला तुमच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा माझा तुम्हाला रोखठोक सवाल आहे. मागच्या दहा वर्षात 4 ते 5 वेळा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडला त्यावेळी शासन नियमानुसार उंचावरच्या म्हणजेच पुण्यातल्या धरणातून खाली सोलापूरसाठी पाणी सोडणे आवश्यक होते परंतु त्यावेळी पाणी सोडले गेले नाही. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची तहान भागवण्यासाठीच आहे. त्यामुळे सध्या आणि भविष्यात उंची वाढवल्यावर देखील त्याचा सोलापूरच्या जनतेच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे. इथल्या शेतकरी कष्टकरी जनतेच्या हक्काचं पाणी आम्ही इतर कोणाला देऊ देणार नाही.असे म्हटले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हर्षवर्धन पाटील या फेसबुक युझरने कंमेट करताना म्हटले आहे की धरणाची उंची वाढवली तर सोलापूर जिल्ह्य़ातील प्रामुख्याने करमाळा तालुक्यातील गावे उठतील आणि त्यांच पुनर्वसन करायला बाकी तालुक्यातील जमिनी हस्तांतरित केल्या जातील एकूण काय तर जमिनी,गावे सोलापूर जिल्ह्य़ातील जाणार आणि पाण्याचा वाटेकरी इंदापूर होणार. त्यापेक्षा अर्धवट राहिलेली स्थिरीकरण योजना करून कृष्णेच वाया जाणार पाणी उजनीत आणा सर्वांना पाणी मिळेल नुकसान कोणाचही होणार नाही.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts