कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी च्या लॉकडाउन मुळे शेतकरी आर्थिक व मानसीक दृष्ट्या संपुर्ण खचला आहे. अजूनही चालू वर्षीच्या गाळप झालेल्या ऊसाची बिले शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत, तरीदेखील शासनाच्या वतीने लाईट बील, घरपट्टी व इतर कर, बँकां व इतर वित्तीय संस्था च्या वतीने विविध प्रकारच्या वसुल्या झाल्या आहेतच.
शासनाने अगोदर कष्टकरी व शेतकरी यांची सोय करावी मगच लॉकडाउन चा विचार करावा अशी मागणी भाजपा चे करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी केली आहे.
शेतीला लागणाऱ्या सर्वप्रकारच्या निविष्ठा, पाईप, मोटार, ड्रीप साहित्यांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेच. शेतमजुरी वाढली आहे, कोरोना मुळे मजूर कामावर येऊ शकत नसल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. ट्रॅक्टर शेत मशागतीचे दर तर गगनाला भिडले आहेत, नेहमीप्रमाणे विजेची अडचण ही ठरलेली आहेच. असे असतानाही शेतमाल कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे, सध्याच्या परिस्थितीत कोणती पिके लावावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.