करमाळा तालुक्यातील ५१ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली आहे. दरम्यान आता नवनियुक्त सदस्यांचे सरपंच आरक्षणा कडे लक्ष लागले आहे . अनेक जण सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग तयार आहेत मात्र अनेक बहुमत असलेल्या पॅनेल मध्ये राखीव उमेदवार नसल्याने धाकधुक वाढली आहे
तालुक्यात ३९१ जागांसाठी ८६० उमेदवार रिंगणात उतरले होते निकाला नंतर आता विजयी उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती रद्द केल्यामुळे नव्याने सोडती होणार असून २७ जानेवारीपर्यंत सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा होणार आहे तर, फेब्रुवारी आखेरीस सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडतील आशी शक्यता वर्तविण्यात येत आहे
२७ जानेवारी रोजी होणार आहे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
=सरकारच्या निर्णयामुळे गोंधळ= यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेमधूनच सरपंचाची निवड करण्यात येत होती. फडणवीस सरकारने यासंबंधीचा नवीन निर्णय लागू केला होता. परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकाने जुनी पद्धत कायम ठेवत फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केला होता. त्याअंतर्गत निवडणुकीपूर्वीच सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षित काढण्यात येत होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने त्यातही बदल करत घोडेबाजार थांबवण्यासाठी निवडणुकीनंतरच सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचे जाहीर केले आहे. सदर निर्णय या निवडणुकीपासून लागू करण्यात आला आहे.त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणसंदर्भात निवडुण आलेल्या सदस्यांसह सामान्य नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेक गावात बहुमत आसेल्या पॅनेल मध्ये अनुसूचित, तसेच मागासप्रवर्गातील उमेदवार नसल्याने नेमके तेच आरक्षण पडले तर सरपंच कोणाचा होणार या विषयी उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.