करमाळा तालुक्यात तब्बल ५१ गावांची ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाली होती त्या पैकी सालसे व जेऊरवाडी हि दोन गावे बिनविरोध झाल्याने उर्वरित ४९ गावात निवडणूकांची रणधुमाळी पहावायस मिळाली .
३९१ जागांसाठी तब्बल ८६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. ऐनवेळेला सरपंदाचे आरक्षण १८ तारखेनंतर जाहीर होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्याने सरपंच पदाचा उमेदवार ठरवताना गाव पुढाऱ्यांची धांदल उडाली . मागील आरक्षण चा विचार करुन काही राखीव उमेदवार सुरक्षित वार्डातुन निवडुण आण्यासाठी पॅनेल प्रमुखांनी मोर्चेबांधणी केली आहे,मात्र असे आसले तरी सरपंच पदाचे आरक्षण निघालेला उमेदवार पराभूत झाल्यास काही ठिकाणी "गड आला पण सिंह गेला" आशी परिस्थिती निर्माण होवु शकते.मात्र आरक्षण व विजयाच्या घोषणे आगोदरच अनेकाजण सरपंच पदाचे बाशींग बांधुण तयार आहेत.
तालुक्यातील ,मांगी देवळाली ,शेटफळ या गावच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे
निकालासांठी फक्त आजची रात्र बाकी आसुन उद्या सकाळी ०९ वाजल्यापासून निकाल हाती येण्यास सुरुवात होईल व दुपारपर्यंत पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे ,उमेदवार व पॅनेल प्रमुखांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवले असुन सर्वांचा जिव टांगणीला लागला आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.