देशाचे नेते व माजी कृषी मंत्री खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज मुबंई येथे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी व मकाई सहकारी साखर कारखान्याचे योग्य नियोजन करुन हे दोन्ही कारखानाने व्यवस्थित सुरु करण्यासाठी आज मुबंई येथे स्पेशल बैठक घेतली.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हि बैठक अतिशय पॉवरफुल झाली असुन दोन्ही कारखाने सुरळीत पणे सुरु करण्यासाठी स्वत:पवार साहेब अत्यंत सकारात्मक भूमिका घेत होते व संबधित खात्याचे मंत्री व आधीकारी यांना बारकाईने सुचना करून त्या काठेेकोर पणे राबविण्याचे आदेश देत असल्याचे समजले.
'आदिनाथ 'मकाई जर पुर्ण क्षमतेने सुरु झाले तर शेतकरी, कामगार, वाहतुकदार यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील , सहकार आयुक्त शेखर गायकवाड , आदिनाथ च्या संचालिका रश्मी दिदी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, बाजार समितीचे संचालक सुभाष गुळवे, मकाईचे एमडी हरिशचंद्र खाटमोडे उपस्थित होते. दोन्ही कारखान्याचा हंगाम यशस्वीपणे यावर्षी चालण्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.