पांडे ,अर्जुनगर व म्हसेवाडी या तिन गावांच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याची सोय करणाऱ्या म्हसेवाडी तलावात दहिगाव उपसा सिंचन योजनेतुन पाणी सोडावे आशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुदादा फरतडे यांनी केली आहे.
निम्मा पावसाळा संपला तरी करमाळा तालुक्यातील पुर्व भागात आद्याप मोठा पाउस झाला नसल्याने या भागातील ओढ्या नाल्यांना पाणी आले नाही त्यामुळे म्हसेवाडी तलावात पाणी साठा झाला नाही, परिणामी परिसरातील विहीर बोर च्या पाण्याची पातळी ऐन पावसाळ्यात घटत चालली आहे.
गेल्या वर्षी म्हसेवाडी तलावात दहिगावचे पाणी पोहचण्या आगोदर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. सध्या पाऊस कमी असल्याने तलाव कोरडा ठाक आहे.
सध्या पांडे व पंचक्रोशीतील खरिप हंगामाची पिके समाधानकारक असली तरी दमदार पाऊस नसल्याने रब्बी हंगामावर टांगती तलवार आहे. दुर्दैवाने मोठ पाऊस न झाल्यास या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. त्या मूळे ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सध्या उजनी ची पाणी पातळी वाढत असल्याने तात्काळ दहिगाव योजना सुरु करुन म्हसेवाडी तलाव भरुन द्यावा आशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुदादा फरतडे पत्रकार दस्तगीर मुजावर, सुनिल भोसले, विकास भोसले, उपसरपंच गहिनीनाथ दुधे, मनोज पाटील, जगन्नाथ कोल्हे, बळीराम आवसारे; दिपक ननावरे, भाऊसाहेब आडसुळ आदींनी केली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.